धाराशिव : धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत आज सोमवारी दि. १८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी धाराशिव तालुक्यातील विविध प्रवर्गांतील एकूण ११० ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये महिला आरक्षणाचाही समावेश आहे. आरक्षणाची विभागणी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा प्रवर्गांमध्ये करण्यात आली आहे.
खुला प्रवर्ग : एकूण ५८ जागा, त्यापैकी महिला २९
खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे :
बोरखेडा, भंडारवाडी, धारूर, दारफळ, खेड, पळसप, करजखेडा, तोरंबा, टाकळी बें., कनगरा, कोंडगाव बार्शी, नितळी, सुर्डी, बामणी, गोरेवाडी, भिकार सारोळा, ईर्ला, ताकविकी, राजुरी, जागजी, बेबळी, अंबेवाडी, चिखली, बावी का, जवळे दु., वाडी बामणी, मेंडसिंगा, काजळा आणि हिंगळजवाडी.
खुल्या प्रवर्गातील इतर ग्रामपंचायती :
बेगडा, देवळाली, कोलेगाव, डकवाडी, येवती, गौडगाव, भंडारी, रुईभर, कसबे तडवळा, वाघोली, म्हाळुंगी, लासोना, टाकळी ढोकी, समुद्रवाणी, बोरगाव राजे, वरुडा, अंबेजवळगा, ढोकी, उत्तमी कायापूर, भानसगाव, सोनेगाव, धुत्ता, दाऊतपूर, तुगांव, सुंभा, मेंढा, सारोळा बु., वाणेवाडी आणि पाटोदा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग : एकूण २९ जागा, त्यापैकी महिला १५
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती :
अंबेहोळ, वडगाव सि., खामगाव, केशेगाव, पिंपरी, सांजा, चिलवडी, कोंड, उपळा मा., आरणी, घुगी, तेर, वाखरवाडी, घाटंग्री आणि कुमाळवाडी.
इतर ग्रामपंचायती :
पोहनेर, गडदेवधरी, उमरगव्हाण, रुई ढोकी, कामेगाव, येडशी, तावरजखेडा, खामसवाडी, गोवर्धनवाडी, खानापूर, पाडोळी आ., नांदुर्गी, सांगवी आणि अनसूर्डा.

अनुसूचित जाती प्रवर्ग : एकूण १९ जागा, त्यापैकी महिला ०९
अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती :
गोपालवाडी, पळसवाडी, कावळेवाडी, जहागीरदारवाडी, आळणी, किणी, बुकनवाडी, कोंबडवाडी आणि पवारवाडी.
इतर ग्रामपंचायती :
मुळेवाडी, विठ्ठलवाडी, रामवाडी, शेकापूर, शिंगोली, वरवंटी, जुनोनी, बरमगाव बु., कोळेवाडी आणि सकनेवाडी.
अनुसूचित जमाती प्रवर्ग : एकूण ०४ जागा, त्यापैकी महिला ०२
अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती :
दुधगाव आणि कौडगाव बावी.
इतर ग्रामपंचायती :
गावसूद आणि महारवाडी.

या आरक्षण सोडतीमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे राजकीय चित्र स्पष्ट होण्यास आता सुरुवात झाली आहे.







