• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, January 26, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या BREAKING NEWS

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सरसकट मदत, आपल्या सर्व मागण्या मान्य – आमदार राणाजगजितसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
October 7, 2025
in BREAKING NEWS, धाराशिव, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
0
MLA Ranajagjitsinha Patil
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात अभुतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मदतही सरसकट आणि अभूतपूर्वच मिळायला हवी अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केली होती. नुकसानीची व्याप्ती आणि शेतकरी बांधवांवर ओढवलेली वेळ पाहून मुख्यमंत्री महोदयांनी २९ जिल्ह्यातील ३५३ तालुक्यातील २०५९ मंडळांना सरसकट मदत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकरी बांधवांना आता सरसकट आणि तीही सर्व निकष बाजूला सारून दिवाळीपूर्वीच मदत मिळणार आहे. आपल्या महायुती सरकारचा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.(MLA Ranajagjitsinha Patil)

महापुरामुळे जिल्ह्यातील नदीकाठची जमीन मोठ्या प्रमाणात खरवडून गेली, विहीरीत गाळ भरला गेल्याने विहिरी खचल्या, पिकांचा तर चिखल होऊन बसला आहे. अशा वेळी नियमांच्या जाचक निकषात न अडकवता जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सरसकट आणि अभुतपूर्व नुकसान भरपाई देऊन तातडीने दिलासा द्यायला हवा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे केली होती. मंगळवारी राज्य सरकारच्या माध्यमातून ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे ऐतिहासिक पॅकेज शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आले आहे. आपण ज्या मागण्या राज्य सरकारकडे लिखित स्वरूपात केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अभूतपूर्व अशा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Related posts

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026

ओला दुष्काळ हा शब्द तांत्रिकदृष्ट्या महसूल नियमावलीत नसला तरी जनभावना लक्षात घेत दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू कराव्यात आणि निकषात न बसणाऱ्या बाबींसाठी विशेष उपाययोजना अंमलात आणल्या जाव्यात असेही आपण मागणीत नमूद केले होते. त्यालाही आपल्या महायुती सरकारने मान्य केले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे राज्य सरकारचा मदत निधी जिथे देता येणार नाही, अशा ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सीएसआर फंडाच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार काम करणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात अभूतपूर्व अशी अतिवृष्टी झाली आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे अनेक बाबी एनडीआरएफच्या निकषात बसत नसल्या तरी सणासुदीच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विशेष उपाययोजना राबवून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. कर्जाच्या वसुलीसाठी बँका शेतकऱ्यांकडे तगादा लावत असल्याचे प्रकार जिल्ह्यात समोर आले होते. त्यानंतर आपण जातीने लक्ष घालत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बँकांना वसुलीची सक्ती न करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यावरही आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील कर्जवसुलीला स्थगिती देण्यात यावी अशी आपण लावून धरलेली मागणीही मान्य झाली असल्याचे आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी सांगितले आहे. ओल्या दुष्काळाच्या काळात ज्या उपाययोजना केल्या जातात त्या सर्व लागू करण्याचा निर्णयही आज जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे विविध सवलती तर मिळणार आहेतच, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत येण्यासाठी ईकेवायसीची अटही शिथिल करण्यात आली आहे. परिणामी अॅग्रीस्टॅकनुसार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मदतीचा निधी थेट जमा होणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

अशी मिळणार मदत

कोरडवाहू जमिनीला प्रति हेक्टर

एनडीआरएफच्या  निकषानुसार मिळणार रु.८५००

त्याव्यतिरिक्त राज्य सरकारकडून रु.१००००

असे एकूण १८ ५०० रुपये कोरडवाहू जमिनीला प्रति हेक्टर मिळणार

हंगामी बागायती

NDRF च्या  निकषानुसार मिळणार रु.१७०००

त्याव्यतिरिक्त राज्य सरकार देणार रु.१००००

असे एकूण रु.२७००० प्रति हेक्टर हंगामी बागायतीसाठी

बागायती जमीन

NDRF च्या  निकषानुसार मिळणार रु. २२५००

त्याव्यतिरिक्त राज्य सरकार देणार रु.१००००

असे एकूण प्रति हेक्टरी ३२,५०० रुपये मिळणार

मर्यादा २ हेक्टर वरून ३ हेक्टर पर्यंत वाढवली.

पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना वरील मदतीव्यतिरिक्त पिकविम्याची अनुज्ञेय रक्कम अधिकची मिळणार.

ज्यांची दुधाळ जनावरे दगावली किंवा वाहून गेली त्यांना प्रति जनावर ₹ ३७५०० याला असलेली तीन जनावरांची असलेली मर्यादा काढण्यात आली आहे. ओढकाम करणाऱ्या प्रति जनावरामागे ₹ ३५,००० रुपये मिळणार आहेत. प्रति कोंबडी १०० रुपयानुसार मिळणार मदत.

खरवडून गेलेल्या जमिनीला मदत म्हणून ₹ ४७५००  प्रति हेक्टर. आणि दुरुस्तीसाठी मनरेगाच्या माध्यमातून ३ लाख रुपये प्रति हेक्टरी.

गाळ गेलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ३०,००० रुपये प्रति विहीर

पडझड झालेली घरे बांधून देणार, नुकसान झालेल्या दुकानांना रु.५०००० मदत

पायाभूत सुविधांसाठी, रस्ते, पूल, शाळा आदी कामांसाठी ₹ १०,००० कोटी रुपये देण्यात येणार.

Previous Post

सरकारची मोठी घोषणा; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

Next Post

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 9 निर्णय! झोपडपट्टीपासून तुकडाबंदीपर्यंत महत्वाचे ठराव

Next Post
Maharashtra Cabinet Meeting Decision 7th october

मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 9 निर्णय! झोपडपट्टीपासून तुकडाबंदीपर्यंत महत्वाचे ठराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

raj thakarey shetkari kamgar paksha

मराठीचा आणि भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही, शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंचा इशारा

6 months ago
Honesty of security guard in Tulja Bhavani temple

तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा; १९ हजारांची रोकड असलेली पिशवी केली परत

3 months ago
धाराशिव पंचायत समिती आरक्षण; 8 पैकी 2 खुले तर 6 आरक्षीत, 4 महिला सभापती

धाराशिव पंचायत समिती आरक्षण; 8 पैकी 2 खुले तर 6 आरक्षीत, 4 महिला सभापती

4 months ago
Nanded Flood situation is under control

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात;नागरिक सुरक्षितस्थळी, सैन्यदलाची बटालियन दाखल

5 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • kharip pik vima 2024

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पूरग्रस्तांना श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट,तेरणा ट्रस्ट कडून दीड कोटी रुपयांची मदत

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल
  • गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
  • डॉ. व्ही. के. पाटील महाविद्यालयाच्या आदित्य गवळीची आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

जिल्हा परिषद निवडणूक : ५ फेब्रुवारी रोजी मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल

January 13, 2026
गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

गावसूद येथे उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

January 13, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.