• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home धाराशिव

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी ५० टीएमसी पाणी; साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

Terna Vruttant by Terna Vruttant
August 26, 2025
in धाराशिव, BREAKING NEWS, महाराष्ट्र
0
50 TMC water for drought-hit areas of Marathwada & W Maharashtra
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाला आहे.’ ट्रक्टेबल’ या जगप्रसिद्ध संस्थेने हा प्रकल्प आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. दुष्काळ निर्मूलन आणि पूर नियंत्रण या दोन्ही बाबी समोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(50 TMC water for drought-hit areas of Marathwada)

पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाल्याने ‘कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून वाहून जाणारे पुराचे ५० टीएमसी पाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी उपलब्ध होणार आहे. महिन्यांत जागतिक बँकेच्या तांत्रिक सल्लागार असलेल्या संस्थेला प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता तो अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेस आता गती मिळणार आहे. अंदाजे १५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून साडे तीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026

९३ किलोमीटर लांबीचा आणि १४ मीटर रुंदीचा बोगदा

कृष्णा खोऱ्यातील समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी ९३ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. २०१९मध्ये कोल्हापूर आणि सांगली भागात आलेल्या पुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून पुराचे पाणी समुद्रात वाहून न जाऊ देता, त्याचा उपयोग दुष्काळग्रस्त भागाच्या सिंचनासाठी केला जाणार आहे. त्यासाठीच हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. एकूण १२६ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात ९३ किलोमीटर लांबीचा आणि १४ मीटर रुंदीचा बोगदा आणि ३३ किलोमीटर लांबीचा कॅनॉल असणार आहे. आशिया खंडातील हा सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘मित्र’ संस्थेच्या अधीनस्थ असलेल्या ‘कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्प’ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात आपल्या अध्यक्षतेखाली कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल जागतिक बँकेच्या तांत्रिक सल्लागाराकडून तीन महिन्यांच्या आत सादर करण्याचा निर्णय झाला होता. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपलब्ध करून दिलेल्या वस्तुनिष्ठ माहितीमुळे मुदतीच्या आता हा अहवाल पूर्ण झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. एकनाथजी शिंदे, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब या सर्वांच्या सहकार्यातून अशक्यप्राय वाटणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पास आता आणखी गती मिळणार असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

न्यायहक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पेक्षा अधिक पाणी मिळणार

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी सात टीएमसी पाण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. उर्वरित १६.६६ टीएमसीपेक्षा अधिकचे पाणी या कृष्णा पूर नियंत्रण प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पूर स्थिती नियंत्रित करता येणार आहे. त्याचबरोबर शेतजमिनीचे, पिकांचे व जीविताचे होणारे नुकसानही टाळण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे  मराठवाड आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागला ५० टीएमसी पाणी उपलब्ध होऊन साडे तीन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले .

Previous Post

राज्यातील कामगार कायद्यांत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Next Post

अभिमानास्पद!धाराशिवच्या अशोक चव्हाणांनी सर केले हिमालय शिखर

Next Post
Dharashiv,s man has scaled the Himalayan peak

अभिमानास्पद!धाराशिवच्या अशोक चव्हाणांनी सर केले हिमालय शिखर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

PM Modi launches two big farm schemes

शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींची मोठी भेट; ३५ हजार कोटींच्या दोन महत्त्वाकांक्षी योजनांचा केला शुभारंभ

8 months ago
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयास रु. ३९.५० कोटी, आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयास रु. ३९.५० कोटी, आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा अध्याय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

1 year ago
Mahavitaran appeals to electricity employees

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

8 months ago
Namo Udyan project Launched by eknath shinde

राज्यभरातील ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान

9 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.