• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 12, 2026
login
Terna Vruttant
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper
No Result
View All Result
Terna Vruttant
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचा पुढील निर्णय; मोजणीची प्रक्रिया तूर्तास स्थगित

Terna Vruttant by Terna Vruttant
June 29, 2025
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचा पुढील निर्णय; मोजणीची प्रक्रिया तूर्तास स्थगित
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव : राज्यातील महत्वाकांक्षी “शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पा”च्या अंमलबजावणी करताना बाधित शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसोबत सविस्तर संवाद साधला. सर्व शेतकरी बांधवांचे म्हणणे जाणून घेतले. शेतकऱ्यांनीही आपल्या समस्या, शंका व मागण्या मोकळेपणाने मांडल्या. आमदार पाटील यांनी त्या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत, सध्या सुरू असलेली जमिनीची मोजणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तात्काळ थांबवण्यात आली आहे.”शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महायुती शासन कोणताही पुढील निर्णय घेणार नाही”, अशी स्पष्ट ग्वाही दिली.

जमिनीची नोंद व प्रत्यक्ष शेतीचा विरोधाभास

Related posts

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Monsoon Maharashtra Update

Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

June 8, 2026

अनेक शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले की, त्यांच्या जमिनीची नोंद जिरायत म्हणून आहे. मात्र प्रत्यक्षात ती बागायती शेतीसाठी वापरली जात आहे. त्यामुळे मावेजा ठरवताना ही बाब लक्षात घेऊन जमिनीचे स्वरूप बागायती म्हणूनच स्वीकारले जावे.अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत योग्य ती पडताळणी करून असे क्षेत्र बागायतीच ग्राह्य धरण्याबाबत प्रशासनाची भूमिका राहील असे आमदार पाटील यांनी म्हटले.

तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी गावातील सुमारे ८० टक्के शेतकरी प्रकल्पामुळे भूमिहीन होणार आहेत. जमिनी गेल्यावर आमचं भवितव्य काय ? असा प्रश्न या भागातील शेतकरी बांधवांनी उपस्थित केला. याबाबत पुढील आठवड्यात सर्व संबंधीत अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेऊन योग्य पर्याय काढण्याचे आमदार पाटील यांनी आश्वस्त केले.बाधित शेतकऱ्यांना मावेजा देण्याबाबत देखील चर्चा झाली. त्यावर प्रचलित दराचा विचार करून शेतकऱ्यांना या विषयात न्याय देण्याबाबत शासनाचा सहानुभूतीचा दृष्टिकोन राहणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

शासनाच्या विविध प्रस्तावित उपाययोजना

महामार्गाच्या लाभक्षेत्रात शेतीस चालना देण्यासाठी प्रत्येक १०० किलोमीटर अंतरात १००० शेततळी निर्माण करण्याचा शासनाचा संकल्प आहे. यामुळे जलसंधारण व सिंचनाच्या दृष्टिकोनातून मोठा फायदा होणार आहे. महामार्गालागत असलेल्या सर्व ओढ्या-नाल्यांवर पूल-कम-बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येणार असून,यामुळे पावसाळी पाणी व वाहतुकीचे अडथळे टळणार आहेत.

शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की, कांही लोक या विषयाचे राजकारण करत असून चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. शेतकऱ्यांनी कोणाच्या भूलथापांना बळी न पडता याबाबत जे वास्तव आहे त्याची माहिती घ्यावी. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच महायुती सरकार याबाबत निर्णय घेणार आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांना याविषयी कांही प्रश्न असतील किंवा शंका असतील त्यांनी लिखित स्वरूपात प्रशासनाकडे मागणी करावी. प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मागणीला लिखित उत्तर देण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर, सध्या सुरू असलेली जमिनीची मोजणी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तात्काळ थांबवण्यात आली आहे.या महामार्गाची कार्यान्वयीन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी बाधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी व शंका जाणून घेणार आहेत व त्यांचं निरसन करणार आहेत.त्यानंतरच याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी अंतिम लढा; २९ ऑगस्टला ‘चलो मुंबई’ 

Next Post

Mumbai local blasts : 2006 च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपी निर्दोष मुक्त; उच्च न्यायालयाचा निर्णय

Next Post
mumbai local blasts 2006

Mumbai local blasts : 2006 च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपी निर्दोष मुक्त; उच्च न्यायालयाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Dharashiv hodpital 350 health camp

पुढील चार महिन्यात ३५० शिबिरांचे नियोजन करा -आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

10 months ago
Bengluru Stampade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

Bengluru Stampade : आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती

1 year ago
Maratha Reservation High Court News

मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटवर स्थगितीस हायकोर्टाचा नकार

8 months ago
२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; अदिती तटकरेंची x वर पोस्ट

२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; अदिती तटकरेंची x वर पोस्ट

11 months ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

POPULAR NEWS

  • तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    तेरणा कॉलेजच्या फार्मसी विभागाचा प्लेसमेंटमध्ये ठसा, ४५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप २०२४ पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तेरणा अभियांत्रिकी मधील बी.फार्मसी विभागाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मिळवले नाईपर परीक्षेत घवघवीत यश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मोठी बातमी! धाराशिव जिल्ह्याला तब्बल ७५० कोटी रुपयांची मदत, १०० कोटी खात्यावर जमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धाराशिव : सरपंच आरक्षण सोडतीने बदललं गावगावचं समीकरण; पहा संपूर्ण यादी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Follow us on social media:

Recent News

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 
  • Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
  • Monsoon Maharashtra : राज्यात १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

Category

  • BREAKING NEWS
  • Crime
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • धाराशिव
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या

Recent News

CM Devendra Fadnavis Helps Latur Farmer

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता ! शेतकरी कुटुंबाला मिळाली तातडीची मदत 

June 11, 2026
Tuljabhavani Temple

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्यांवर व कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

June 9, 2026
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2025 तेरणा वृत्तांत.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • धाराशिव
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
  • ePaper

© 2025 तेरणा वृत्तांत.